संपादक – गणेश जाधव , प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावूक झाले होते. बारामती पोरकी झाल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अजित पवार गेल्यानंतर बारामतीचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार, हा प्रश्न उपस्थित होत होता.
मात्र या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम देत शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट नदीकाठी पोहोचले आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला.
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असताना, त्याचवेळी शरद पवार नावाचं राजकीय ‘रसायन’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. भल्याभल्यांना न समजलेली शरद पवारांची राजकीय खेळी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार, बारामतीचं नेतृत्व कुणाकडे जाणार, यावर चर्चा रंगलेली असताना, दुसरीकडे शरद पवार थेट बारामतीच्या प्रश्नांमध्ये सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावूक झाले होते. बारामती पोरकी झाल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. अजित पवार गेल्यानंतर बारामतीचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार, हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम देत शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट नदीकाठी पोहोचले आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला.
बारामती शेजारील नीरा वाघज गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करताना शरद पवारांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नदी प्रदूषणाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नसून, शेतकरी, पिण्याचं पाणी आणि बारामतीच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं. अनेक वर्षांनंतर शरद पवार प्रत्यक्ष बारामतीच्या प्रश्नावर मैदानात उतरल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
एक काळ असा होता की शरद पवारांनी बारामतीचा कारभार पूर्णपणे अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः दिल्लीच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतली होती. तेव्हापासून बारामतीच्या प्रत्येक प्रश्नात अजित पवार पुढाकार घेत असत. मात्र आता अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची सूत्रे पुन्हा एकदा स्वतः शरद पवारांनी हाती घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, ज्या वेळी पवार कुटुंबीय अजित पवारांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी बारामतीजवळील सोनगावमध्ये पोहोचले होते, त्याच वेळी शरद पवार नीरा वाघज येथे प्रदूषित नदीची पाहणी करत होते. हा केवळ योगायोग नसून, बारामतीला आपण एकटे सोडणार नाही, असा सूचक संदेश शरद पवारांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं, अशी गळ घातल्याचं दिसत आहे. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी आणि उपमुख्यमंत्रिपद घ्यावं, अशा हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचीही रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.
मात्र नेमक्याच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याने राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. बारामती आणि शरद पवार यांचं अतूट नातं पुन्हा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे का, की येणाऱ्या काळातील मोठ्या राजकीय निर्णयांची ही नांदी आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.








